Site icon Marathi Sprouts News

Food Scam : मुंबईत ३ कोटींचा अन्न घोटाळा, माजी नगरसेवकावर आरोप

Food Scam मुंबईत ३ कोटींचा अन्न घोटाळा माजी नगरसेवकावर आरोप

Food Scam : मुंबईत ३ कोटींचा अन्न घोटाळा, माजी नगरसेवकावर आरोप

मुंबईत कोविड लॉकडाऊनच्या काळात, गरजू नागरिकांना अन्न पुरवठा करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार समाजसेविका पायल शहा यांनी दाखल केली आहे. ‘शिव सेवा संस्था’ ही स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे पदाधिकारी विनायक कोळी आणि भावेश तेलंग यांच्याविरोधात त्यांनी सायन पोलीस स्टेशन आणि सहायक आयुक्त (नियोजन/ ए ऍण्ड सी) यांच्याकडे तक्रार केली आहे. ‘स्प्राऊट्स’ या वृत्तपत्राच्या एसआयटीला या तक्रार अर्जाची प्रत प्राप्त झाली आहे.

कोविड महामारीच्या काळात गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी सरकारने स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने जागोजागी अन्न वाटप केले. प्रत्येक ३०० ग्राम खिचडीच्या पाकिटासाठी पालिकेने ३२ रुपये दर ठरवला होता. १४ एप्रिल २०२० रोजी शिव सेवा संस्थेलाही अन्न वाटपासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली. मात्र संस्थेच्या नावे अन्न वाटप झालेच नाही. याउलट व्यक्तिगत लाभासाठी राजकीय नावांचा वापर केला गेला.

शिव सेवा संस्थेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्न वाटप करण्यासाठी कोणत्याही आवश्यक सुविधा नव्हत्या. शिवाय अन्न आणि पुरवठा कार्यासाठी आवश्यक पूर्वानुभवही नव्हता. तरीही राजकीय लागेबंधातून त्यांना हे देण्यात आले. सायन येथील राजेश शिरवाडकर आणि त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांच्या मध्यस्थीने हे नियमबाह्य काम करण्यात आले, असा शहा यांचा आरोप आहे.

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात संस्थेला कोविड सहाय्यता निधी मधून २ कोटी ९७ लाख रुपये मिळाले. म्हणजेच ९ लाख पाकिटे वाटली गेली असा संस्थेचा दावा आहे. मात्र प्रभागातील लोकसंख्या विचारात घेता हा आकडा बोगस आहे. प्रत्यक्षात एवढी पाकिटे वाटली गेलीच नाहीत, असा शहा यांचा आरोप आहे. सकाळ – संध्याकाळ असे दोन वेळा अन्न वाटप अपेक्षित होते, मात्र संध्याकाळच्या वेळी कधी खिचडी वाटप झालेच नाही, असा त्यांचा दावा आहे. महामारीच्या काळात जनतेच्या पैशाचा असा अपहार करणाऱ्या संस्था आणि संबंधित व्यक्तीवर सक्त कारवाई व्हावी, अशी मागणी शहा यांनी केली आहे.

सध्या, मुंबई पोलिस आणि चॅरिटी आयुक्तांनी तक्रार प्राप्त झाल्याची पावती दिली आहे. एफआयआर किंवा चौकशी याबाबत प्राशसनाकडून अधिकृत उत्तर आलेले नाही. संबंधित व्यक्तींनीही या आरोपांचे अद्याप जाहीर खंडन केलेले नाही.

सायनमधील एसआरए प्रकल्पात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

भाजप नगरसेविकेच्या पतीसह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

सायन येथील सायन–आकार एसआरए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (भंडारवाडा) या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तब्बल १०० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपच्या नगरसेविका सौ. राजश्री शिरवाडकर यांचे पती राजेश शिरवाडकर, तसेच भावेश तेलंगे, वैभव व्होरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलीस, धर्मादाय आयुक्त आणि ईडीकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

१९९५ पासून रखडलेला प्रकल्प

सदर एसआरए प्रकल्प १९९५ मध्ये सुरू झाला. त्या वेळी परिशिष्ट–२ नुसार ४१२ पैकी सुमारे ५०० झोपडपट्टीवासी पात्र तर ८८ अपात्र असल्याची नोंद होती. मात्र, २०१५ पर्यंत प्रकल्प रखडलेलाच राहिला.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभार्थी वाढवल्याचा आरोप
२०१५ नंतर स्थानिक राजकीय हस्तक्षेप वाढल्यानंतर खोटी कागदपत्रे तयार करून परिशिष्ट–१ मध्ये नावे समाविष्ट करण्यात आली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या माध्यमातून १०० ते १५० नवीन सदस्य बेकायदेशीररीत्या पात्र ठरवण्यात आल्याचे म्हटले आहे.

अधिक वाचा : – सायनमधील एसआरए प्रकल्पात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

• प्रत्येक झोपडी ४५ लाखांना विक्री?

तक्रारीनुसार, पात्रतेच्या आमिषाने अनेक झोपडपट्टीवासीयांकडून मोठ्या रकमा उकळण्यात आल्या. काही पात्र ठरवलेल्या झोपड्या प्रत्येकी सुमारे ४५ लाख रुपयांना विकल्या गेल्याचा आरोप असून, यामुळे घोटाळ्याची रक्कम १०० कोटींपर्यंत पोहोचू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

• कुटुंबीयांच्या नावावर झोपड्या बळकावल्याचा दावा

तक्रारदारानुसार, भावेश तेलंगे यांनी स्वतःसह कुटुंबीयांच्या (केतन तेलंगे, बळीराम तेलंगे) नावावर २० ते २५ झोपड्या बळकावल्या, तर काहींची विक्रीही केल्याचा आरोप आहे.
तसेच वैभव व्होरा व त्यांचे नातेवाईक पात्र नसतानाही लाभार्थी ठरल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

• कार्यालयातून घोटाळा चालवल्याचा आरोप

हा संपूर्ण व्यवहार माटुंगा येथील समृद्धी हाइट्स, कार्यालय क्रमांक ४०१ येथून चालवला गेल्याचा आरोप असून, तेथे तपास झाल्यास बनावट कागदपत्रे व पुरावे सापडतील, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

• एफआयआर आणि स्वतंत्र चौकशीची मागणी

तक्रारदार अतुल बबन भिसे यांनी या प्रकरणाची ईडी, ईओडब्ल्यू किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून संबंधितांविरोधात तात्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version